गणपती विसर्जन मिरवणूकीत जखमी झालेल्या इसमाचे उपचाराच्या दरम्याने निधन, चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी शहरानजिकच्या कारवांचीवाडी येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत टेम्पोचे ब्रेक फेल झाल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना २८ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी विनोद बाबूराव भितळे यांनी फिर्याद दिली आहे. यानुसार आरोपी प्रकाश लक्ष्मण जोशी हे कारवांचीवाडी कुळयेवाडी येथे गणपती विसर्जन मिरवणुकीत आपल्या ताब्यातील आयशर टेम्पो (क्र.एम.एच. ०८ एच २५५६) यातील हौद्यात विसर्जन मिरवणुकीकरिता गणपतीच्या मूर्ती ठेवत चालवत होते. आरोपीने हयगयीने अविचाराने स्वतःचे किंवा दुसर्‍यांचे जिवितास या मालमत्तेस हानी पोहोचेल अशा स्थितीत टेम्पो चालवला. कारण टेम्पोच्या समोर ढोल ताशांचे वादन सुरू असताना २८ सप्टेंबर रोजी कारवांचीवाडी येथील विलास बारगोडे यांच्या घरासमोरील डांबरी रस्त्यावर टेम्पो आरोपीच्या ताब्यातील टेम्पोचे ब्रेक न लागल्याने टेम्पो रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या गटारालगतच्या दगडी गडग्यास आदळला. यात टेम्पोच्या पुढील बाजूस असलेल्या सुभाष हरिश्‍चंद्र कुळ्ये (५२) हा ताशासह टेम्पोच्या पुढील बंपर खाली आल्याने त्याला उपचाराकरिता एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान सुभाषला गंभीर दुखापत झाली व यातच त्याचा ९ ऑक्टोबर २०२३ रोजी मृत्यू झाला.                                       www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button