
ज्येष्ठ नागरिकांची रेल्वे प्रवास सवलत पूर्ववत सुरू करण्यासाठी श्री राम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टा तर्फे पंतप्रधानांना निवेदन
रत्नागिरी : ज्येष्ठ नागरिकांना भारतीय रेल्वे कडून मिळणारी रेल्वे प्रवास भाड्याची सवलत कोरोना काळात बंद करण्यात आली. कोरोना काळ संपून तीन वर्षे होत आली तरी ती पूर्व सुरू करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. ही सवलत तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी रत्नागिरी येथील श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्यावतीने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मागणीच्या पाठपुराव्यासाठी दिनांक 13 सप्टेंबर रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदन देऊन ते पंतप्रधानाकडे पाठविण्यासाठी विनंती करण्यात आली आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी या निवेदनाचा स्वीकार करून ते पंतप्रधानांकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिष्टमंडळातील श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टाचे मुख्य संयोजक सुरेश विष्णू तथा अण्णा लिमये, सचिव सुरेंद्र घुडे, सदस्य रमाकांत पांचाळ, रमेश गोवेकर, श्रीमती संजीवनी जामखेडकर हे उपस्थित होते. या नियोजनाच्या प्रती राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदय सामंत तसेच खासदार विनायकराव राऊत यांनाही देण्यात आल्या आहेत.
www.konkantoday.com