चिपळूण शहरातील शिवाजीनगर परिसरातील वणव्यात १५ हजार क्युबिक टन कचरा जळून खाक

चिपळूण शहरातील शिवाजीनगर परिसरातील नगर परिषदेच्या कचरा प्रकल्पात मंगळवारी दुसर्‍या दिवशीही वणवा शिरला. आगीत १५ हजार क्युबिक टन कचर्‍याची राखरांगोळी झाली. हा कचरा २०२१ साली आलेल्या महापुरातील होता. तेव्हापासून या कचर्‍यावर बायोमायनिंग प्रक्रिया सुरू होती. त्यातूनच खत निर्मिती होत आहे. मात्र या वणव्यातून तयार खत व ठेकेदाराची यंत्रसामुग्री वाचवण्यात नगर परिषदेला यश आले.सोमवारी लागलेला वणवा आटोक्यात आणण्यात नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांना यश आले होते. मात्र दुसर्‍या दिवशीही वणव्यातील आगीपुढे त्याचे प्रयत्न अपुरे ठरले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button