भाजपसोबत युतीत राहून शिवसेनेची भाजप झाली नाही. तशीच काँग्रेससोबत राहिल्याने शिवसेनेचीकाँग्रेस होऊ देणार नाही-उद्धव ठाकरे
शिंदे गटाने एका पोस्टरवर शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, असे लिहिले हाेते, असे सांगत २५ ते ३० वर्षे भाजपसोबत युतीत राहून शिवसेनेची भाजप झाली नाही. तशीच काँग्रेससोबत राहिल्याने शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, अशा शब्दांमध्ये आज ( दि.१०) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. जळगावमध्ये आयोजित वचनपूर्ती सभेत ते बोलत होते.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही इंडिया नाव बदला, आम्ही पंतप्रधान बदलू, असे आव्हान देत भाजपला सत्तेच्या माेहातून पक्षांची फोडाफो इंडिया, भारत, हिंदुस्थान आमचा अभिमान आहे. इंजिन मागून इंजिन लावत आहेत, पण कारभार शून्य आहे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.
भाजपने केवळ चोरीचे काम केले असून बाळासाहेबांना चोरण्याचा प्रयत्न केला आहे. काही लोकांच्या डोक्यात हवा गेली आहे, राज्याचे मुख्यमंत्री केवळ चमकोगिरी करत आहेत, अशा निशाणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता साधला. मणिपूरमध्ये हिंसाचाराने जनजीवन विस्कळीत झाले आहे. परंतु देशाचे पंतप्रधान विदेशी पाहुण्यांच्या भेटीत व्यस्त आहेत. सरदार वल्लभभाईंच्या कामाची उंची कधी गाठणार, असा सवाल ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना केला.
www.konkantoday.com