रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. नाना जोशी यांचे निधन


रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. नाना जोशी यांचे आज निधन झाल
रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. नाना जोशी हे उत्तम ज्योतिषी होते तसेच कीर्तनातील मार्गदर्शक होते. रत्नागिरीचे जोशी पण त्यांच्याकडे होते.
म्हणजेच रत्नागिरीतल्या कोणत्याही मंदिरामध्ये कार्यक्रम होता ना या घराण्याची संमती घेऊन तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम पिढ्यानपिढ्या होत असत.
नाना उत्तम गायक आणि तसेच हार्मोनियम वादक पण होते.
त्यांच्या ज्योतिष व्यवसायामुळे अगदी खेड्यापाड्यातल्या लोकांपर्यंत त्यांचा संपर्क होता. आणि तिथले लोक त्यांना मानत पण असत. त्यांचा शब्द हा अंतिम मानला जात असे.
रत्नागिरी शहर व आजूबाजूच्या परिसरात नाना जोशी धार्मिक कार्य व विधीसाठी प्रसिद्ध होते.
साधारण 50 ते 60 वर्षापासून नाना समाजातील सर्व वर्गातील लोकांच्या घरी जाऊन धार्मिक पूजा,विधी तसेच प्राचीन मंदिरातील धार्मिक विधी यासाठी आवर्जून त्यांना बोलावलं जात असे
धार्मिक विधी व कार्य करणारे पहिले नाना जोशी सगळ्यांच्या परिचयाचे होते.
तसेच रत्नागिरी शहरातील वरच्या आळी मध्ये असणारे प्रसिद्ध अशा 18 हाताच्या गणपती मंदिराचे ते मालक होते.
या मंदिरात दररोज वर्षाचे बारा महिने ही विधिवत कार्यक्रम सुरू असतात.
त्याचप्रमाणे नाना जोशी यांना पत्रिका, ग्रहताऱ्यांचा अभ्यास असल्यामुळे ते लोकांच्या जन्मपत्रिकाही बघत असत.
त्यासाठी त्यांच्याकडे अगदी मुंबईपासून लोक पत्रिका घेऊन येत असत.
घराच्या बांधणीसाठी किंवा धार्मिक विधीसाठी नानांना आवर्जून बोलवले जात असे किंवा त्याचे मार्गदर्शन घेतले जात असे.
त्याचप्रमाणे रत्नागिरी शहरातील पुरातन मंदिरे किंवा त्याचे सुशोभीकरण कलश रोहणं किंवा त्या मंदिराची पुनर्बांधणी असेल तर पायाभरणीसाठी नाना जोशी यांच्या उपस्थितीतच होत असेते
रत्नागिरीतील जेष्ठ कीर्तनकार होते.
नाना जोशी यांचे आज पहाटे 2.30 वाजता कोल्हापूर येथे निधन झाले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button