प्रेमविवाहाच्या संसारात चार वर्ष मूल होत नसल्याने दाम्पत्याने केली फिनेल पिऊन आत्महत्या

चिपळूण  : प्रेमविवाह झालेल्या संसाराला चार वर्षे उलटून गेली तरी मूल होत नाही, या निराशेतून पती-पत्नीने विष पिऊन आत्महत्या केली. अलोरे येथे ही घटना घडली. आदिवासी कातकरी कुटुंबात घडलेल्या या घटनेची माहिती आत्महत्या करणार्‍या मुलीच्या आजीने शिरगाव पोलिस ठाण्यात दिली. संजय सदा निकम (वय 33) व सोनाली संजय निकम (वय 25) असे या दोघांची नावे आहेत. पोलिस ठाण्यातील माहितीनुसार, सोनालीच्या आजी-आजोबांसोबत हे दाम्पत्य अलोरे चेंबरी येथे झोपडे उभारून राहत होते. मूल नसल्याचे शल्य त्यांना होते. तसे संवाद त्यांच्यात होत होते.
सोमवारी संध्याकाळी आजी-आजोबा बकर्‍या घेऊन रानात गेले होते. संजय आणि सोनाली दोघेच घरी होते. यावेळी त्यांनी फिनेल प्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर सायंकाळी चार वाजता बकर्‍या चारून आजी-आजोबा घरी परत आले. त्यावेळी जेवण्यासाठी संजय आणि सोनल निकम यांना उठविण्यासाठी गेले असता ते उठत नव्हते. त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागला. त्यानंतर आजीने अलोरे शिरगाव पोलिसांना खबर दिली. डॉक्टरांनी त्यांना तपासून  मृत घोषित केले. अधिक तपास आलोरे-शिरगाव पोलीस ठाण्याचे दिलीप पवार करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button