संगणक परिचालकांचे बेमुदत काम बंद आंदोलन

ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. मागील चार महिने थकीत असलेले मानधन आणि आगामी माधनाबाबत असलेली अनिश्‍चितता याविरोधात जिल्हास्तरीय कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. संगणक परिचालक हे महिना सात हजार एवढ्या तुटपुंज्या मानधनावर काम करतात. हे मानधनही गेले चार महिने त्यांना मिळालेले नाही. मार्च महिन्यापासून हे परीचालक मानधनापासून वंचित आहेत. वारंवार मागणी करूनही हे मानधन खात्यावर वर्ग करण्यात आलेले नाही. संगणक परिचालकांचे वर्षभराचे मानधन हे ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात येते. त्यानंतर जिल्हा परिषद हे मानधन ठेकेदार कंपनी सी एस सी कडे वर्ग करते. ही कंपनी त्यातील आपला वाटा काढून घेऊन उर्वरित मानधन परिचालकांच्या खात्यावर जमा करते. चालू आर्थिक वर्षाचे मानधन अद्याप जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आलेले नाही. त्यामुळे मागील आर्थिक वर्षात जमा असलेल्या मानधनातून परिचालकांचे केवळ मार्च महिन्याचे मानधन अदा होऊ शकते. एप्रिल, मे आणि जून महिन्यांचे मानधन मात्र पुढील काही काळ थकीतच रहाण्याची चिन्हे दिसत आहेत. या सगळ्या अनागोंदी कारभाराविरोधात परिचालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. मुळातच तुटपुंजे मानधन आणि तेही चार महिने थकीत याबाबत परिचालकांनी तीव्र संताप व्यक्‍त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button