जिल्ह्यात 10 जुलैपर्यंत वादळी वारे
भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबई यांच्याकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार, 10 जुलैपर्यंत दक्षिण महाराष्ट्र व गोवा किनारी ताशी 40 ते 60 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा वर्तवण्यात आला आहे. मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये. नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.