आज हे थांबवलं नाहीत तर उद्या ही लोक तुमच्या घरात घुसतील – कालच्या बैठक उधळण्याच्या प्रकारावरून माजी खासदार निलेश राणे संतापले, पहा व्हिडिओ.

काल रत्नागिरी येथे एका हॉटेलमध्ये चर्चासत्राच्या वेळी उदय सामंत समर्थकांनी बैठकीचा ताबा घेऊन जो प्रकार केला त्याबाबत आता माजी खासदार निलेश राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहेआज हे थांबवलं नाहीत तर उद्या ही लोक तुमच्या घरात घुसतील असाही इशारा त्यांनी यावेळी दिला आहे याबाबत त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला आहेया व्हिडिओतभाजप कार्यकर्त्यानी लोकांसाठी चर्चा सत्र लावा मी स्वतः येतो फक्त एकच अट आहे कोणत्याही व्यक्ती बाबत ही चर्चा नसावी तर शहरातील समस्या बाबत चर्चा झाली पाहिजे.काल जी सभा उधळली त्यात 70 लोक नंबरकारी होते.आज हे थांबवलं नाहीत तर उद्या ही लोक तुमच्या घरात घुसतीलया मध्ये बोलताना भाजप नेते निलेश राणे यांनी सांगितले आहे कि काल जे चर्चा सत्र होणार होते त्यात रत्नागिरीत कुठे काय चुकतंय अशा विषयांवर त्यांना चर्चा करायची होती. त्याच्यामध्ये चूक काय? जर व्यक्तीवर चर्चा नव्हती आणि विषयांवर चर्चा होती तर ती चांगली गोष्ट आहे. जी सभा उधळली गेली ती कशासाठी सभा उधळली गेली. म्हणजे मी लोकप्रतिनिधी होतोआमच्या घरात ही लोकप्रतिनिधी आहेत ते मतदारसंघ सांभाळतात त्यांना कधी असं वाटलं नाही की चर्चा होऊ नये.लोकांची ही पद्धत कुठली सुरू झाली. रत्नागिरीमध्ये मला माहिती नाही. आपल्याला रत्नागिरीचे बिहार करायचं आहे का? नेमकं काय चाललंय काल काय धक्काबुक्की झाली जी काही लोक सभा उधळायला गेली होती. ना जी काय लोक 40-50 गेले होते. मला नेमकं माहिती नाही तुम्ही नंबर कारी लोकांना घेऊन तिथे जाऊन आंदोलन करता काय म्हणून तुम्हाला कोणी अधिकार दिला. तुम्ही चर्चा करा काही हरकत नाही आमच्या सारखा माणूस काल तिथे चर्चेला आला असता तर हे झालं असतं का? स्वतःहून हे बिंदास आले स्वतःहून धक्काबुक्की केली लोकांना धमक्या दिल्या माईक पकडून पकडून घोषणा देत होते. वास्तविक याबाबत पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे होते महामार्गाचा विषय काढला माझं चॅलेंज आहे महामार्गासाठी जे काय बोलत होते ना महामार्गाची आम्ही टीका करू कालावा एकदा गडकरी साहेबांकडे मीटिंग मलाही बघायचंय त्या मीटिंगमध्ये काय होतं ते आणि कशामुळेच रत्नागिरीतील रत्नागिरी चा महामार्गाचा पॅच झाला नाही. याचाही एकदा कधीतरी हिसाब लागला पाहिजे बाकी सगळीकडचा महामार्गाचा पॅच होतो आणि रत्नागिरीचाच होत नाही याचा कधीतरी हिशोब लागला पाहिजे आम्ही काय तोंड उघडत नाही म्हणजे आम्हाला उगाचच कोणावर टीका करायला आवडत नाही. पण तुम्ही पण आमच्या नेत्यांवर असं उघड बोलत असाल तर आम्ही काही ते गप्प बसायला बसलेलो नाही आता ही शिस्तीत वागा आणि लक्षात ठेवा कोणाला जर रत्नागिरी चर्चा करायची असेल व्यक्तीवर नाही तर विषयांवर तर ती झालीच पाहिजे. माझी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे. गप्प बसू नये, नेहमी मी येईन आणि काहीतरी करेल तरी करेन याची वाट बघू नका आपण काहीतरी या मातीचं देणे लागतो. उतरा मैदानात द्या लोकांची साथ कोणालाही घाबरू नका लोकांना जर चर्चा करायची असेल तर लावा ते चर्चासत्र मी येतो. आम्हाला युतीच्या धर्माच्या आमच्या मर्यादा माहिती आहेत आम्ही मर्यादा ओलांडणारा तो माणूस मी नाही.मर्यादेत राहून काम करणारा मी माणूस आहे.जर सामान्य लोकांवर असे हात टाकले जाणार असतील तर तर ते मी काही सहन करणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button