राष्ट्रीय भ्रष्टाचार नियंत्रण व जनकल्याण संघाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी प्रसाद सावंत यांची निवड

रत्नागिरी : नीती आयोग , नवी दिल्ली यांची मान्यता असलेल्या राष्ट्रीय भ्रष्टाचार नियंत्रण व जनकल्याण संघाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी प्रसाद सावंत यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय सचिव रणजित वर्मा यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले आहे. ही निवड २०२२ ते २०२५ या तीन वर्षांसाठी करण्यात आली आहे. प्रशासनातील वाढता भ्रष्टाचार वेळीच रोखला जावा, यासाठी तळागाळात काम करणारे हे संघटन आहे. राज्य सचिव प्रकाश पांढरे, आनंद त्रिपाठी यांनी या निवडीबद्दल अभिनंदन केले. कोणालाही मुद्दाम त्रास देण्याच्या हेतूने कोणतीही कार्यवाही केली जाणार नाही. मात्र सर्वसामान्य लोकांना आधार मिळेल, असे काम आपली संघटना करेल, असे प्रसाद सावंत यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button