जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांची १५ दिवसात बदली न झाल्यास धान्य वितरण बंद करणार -रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक-मालक संघटनेचा इशारा

जिल्हा पुरवठा कार्यालयात येणार्‍या रेशन दुकानदार संघटनेच्या पदाधिकार्‍यांचा अवमान करतात त्यामुळे जिल्ह्यातील दुकानदारांमध्ये नाराजी असून सदर अधिकार्‍याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. येत्या १५ दिवसात त्यांची बदली न झाल्यास धान्य वितरण बंद करण्यात येईल, असा इशारा रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक-मालक संघटनेतर्फे निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम यांनी दिली.
रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसिन चालक-मालक संघटनेची सभा गुरूवारी सकाळी चिपळूण येथे जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम यांच्या निवासस्थानी झाली. या वेळी पुरवठा अधिकार्‍यांबाबत जोरदार चर्चा झाली. दुकानदारांच्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. कोरोनाच्या काळात शासनाचे कोणतेही संरक्षण अथवा सहकार्य नसताना कार्डधारकांना स्वतःचा जीव धोक्यात घालून धान्य वितरण केले. तरी जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी शाबासकी किंवा धन्यवाद दिले नाहीत, उलट दुकानदारांना तपासणीच्या माध्यमातून एडीएसओंना बरोबर घेवून नाहक त्रास देण्याचे काम करीत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button