राणे जामीन सुनावणी दरम्यान सरकारी वकील आणि नितेश राणे यांच्या वकिला दरम्यानच चांगलाच युक्तिवाद रंगला

सिंधुदुर्ग: नितेश राणे यांच्या अंतरीम जामीन अर्जावर आज चार तास कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकील आणि नितेश राणे यांच्या वकिला दरम्यानच चांगलाच युक्तिवाद रंगला.पोलीस महासंचालक सिंधुदुर्ग जिल्ह्यात काय करतात असा सवाल राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी केला. त्यावर पलटवार करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे तरी इथे काय करतात? असा सवाल सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला.
काल दुपारी नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने गुरुवारी यावर निर्णय देणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे नितेश राणे यांना काल दिलासा मिळू शकला नाही. तर, कोर्ट गुरुवारी काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button