विधानसभेत भाजपचे सगळे आमदार पाडणार- मनोज जरांगे

. मराठा आरक्षणचा मुद्दा दिवसेंदिवस वेगळं वळण घेत आहे. २९ सप्टेंबरपासून मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण करण्याचा निर्धार केला आहे. २९ सप्टेंबरपासून मनोज जरांगे हे पुन्हा उपोषणाला बसणार आहेत.तसेच विधानसभेत भाजपचे सगळे आमदार पाडणार असा निर्धारही त्यांनी केला आहे. ते आज अंतरवाली सराटीमध्ये बोलत होते.माझ्या नादाला लागू नको. मी तुझा शत्रू नाही. जर मला तुरुंगात टाकलं तर नागपूरची जागाही येणार नाही, एवढं लक्षात ठेवावं, असा इशारा मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणविसांना दिला आहे. ते म्हणाले की, आता आरपारची लढाई आहे. आपल्याला २९ सप्टेंबर ही तारीख लक्षात ठेवायची आहे. या दिवशी मी उपोषणाला बसणार आहे. ही लढाई आपल्याला जिंकायची आहे. या सरकारला आपल्याला खाली आणयचे आहे. त्यांना दाखवून द्यायचे आहे, असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button