
शिवसेना क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांच्या इशाऱ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम अखेर पुन्हा सुरू
गेल्या दीड वर्षापासून अधिक काळ ठप्प असलेली येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूढ पुतळ्याचे काम शिवसेना क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांच्या यांच्या इशाऱ्यामुळे अखेर पुन्हा सुरू झाले. नगरपालिका प्रशासन तसेच ठेकेदार यांच्यामध्ये चर्चा करून बाळा कदम यांनी काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा करून दिला आणि शनिवारपासून पुन्हा कामाला सुरूवात झाली आहे. आता पुन्हा काम थांबल्यास थेट रस्त्यावर उतरू असा इशारा देखील बाळा कदम यांनी दिला आहे.
www.konkantoday.com