रत्नागिरी शहरातील मांडवी व भाट्ये समुद्रकिनारी गणपती विसर्जन करणार्यासाठी येणार्या लोकांव्यतिरिक्त इतर लोकांना येण्यास मनाई, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
रत्नागिरी शहरातील मांडवी व भाट्ये समुद्रकिनारी गणपती विसर्जन करणार्या येणार्या लोकांव्यतिरिक्त इतर लोकांना येण्यास मनाई करण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. बी. एन पाटील यांनी काढलेआहेत मनाई आदेश मांडवी व भाट्ये समुद्रकिनारी दिनांक १४सप्टेंबर व दिनांक १९सप्टेंबर २०२१रोजी विसर्जन ठिकाणी गणपती मूर्ती घेऊन येणार्या लोकांनाच प्रवेश देण्याचा जाणार आहे.
गणपती विसर्जना शिवाय अन्य कोणत्याही कारणासाठी जाणाऱ्या लोकांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(4) 43 नुसार मनाई आदेश काढण्यात आले आहेत.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व गर्दी होऊन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये या हेतूने प्रवेशास बंदी करण्यात आली आहे
www.konkantoday.com