
रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना तुळजाभवानी देवीच्या साड्यांची मदत पाठविण्यात येणार
उस्मानाबाद जिल्हयाच्या दौऱ्यावर असताना पालकमंत्री तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी श्री. तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या समितीस महाराष्ट्रातील रायगड,रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्हयातील पूरग्रस्तांना देवीच्या २५ हजार साड्यांची मदत पाठविण्याचे आवाहन केले होते.पालकमंत्र्यांच्या या आवाहनास प्रतिसाद देत मंदीर संस्थान समितीने या २५हजार साड्यांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीच्या या निर्णयाचे पालकमंत्री गडाख यांनी कौतूक करून मंदिर समितीचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.
मंदिर संस्थान समितीकडे असलेल्या नऊवार एक हजार आणि सहावार चोवीस हजार साड्यांचे नग आहेत. एकूण २५ हजार साड्या महाराष्ट्रातील महापूराने बांधित झालेल्या रायगड,रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वाटपासाठी पाठविण्यात येणार आहेत.
www.konkantoday.com