राज्याच्या रस्त्यांचं सुमारे १ हजार ८०० कोटी रुपयांचं नुकसान,एकट्या कोकण विभागातसुमारे ७०० कोटी रूपयांचे नुकसान

राज्यात अतिवृष्टी, महापूर आणि दरड दुर्घटनांमुळे राज्याच्या रस्त्यांचं सुमारे १ हजार ८०० कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, “राज्याच्या सर्वच विभागांमध्ये अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे रस्ते व पुलांचे प्रचंड नुकसान झाले आहे.सर्वाधिक म्हणजेच सुमारे ७०० कोटी रूपयांचे नुकसान एकट्या कोकण विभागात झाले आहे. त्याखालोखाल पुणे विभाग, अमरावती विभाग, औरंगाबाद विभाग, नागपूर विभाग व नाशिक विभागाचा क्रम आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यांमधील हानीची पाहणी करण्यासाठी जिल्हानिहाय मुख्य अभियंत्यांची व समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.”
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button