अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे ३७२१ कोटी रुपयांची मागणी , केंद्राची फक्त ७०१ कोटी रुपयांची मदत

राज्यात गेल्या वर्षी म्हणजे जून ते ऑक्टोबर २०२० दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे ३७२१ कोटी रुपयांची मागणी के ली असताना केंद्रातील मोदी सरकारने मात्र मंगळवारी के वळ ७०१ कोटी रुपयांची तुटपुंजी मदत जाहीर करत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून अर्थसहाय्य करण्याची विनंती राज्य सरकारने केंद्राकडे एका निवेदनाद्वारे केली होती
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button