जिल्ह्यात अकरावी प्रवेश क्षमतेपेक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी,सर्वांना प्रवेश मिळणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण बोर्डातर्फे घेण्यात आलेल्या शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत जिल्ह्यातून २१ हजार ८० विद्यार्थ्यानी नोंदणी केली होती. कोरोनामुळे परीक्षा रद्द केल्याने अंतर्गत मूल्यमापनानुसार निकाल घोषित करण्यात आला. सर्वच विद्यार्थी पास झाले असून एकूण निकाल १०० टक्के लागला आहे. जिल्ह्यातील १४१ कनिष्ठ महाविद्यालयामध्ये २७ हजार ४२० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. प्रवेश क्षमतेपेक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊनही ६,३४० जागा शिल्लक राहणार असून अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरळीत होणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button