
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपशी जुळवून घ्यावे रामदास आठवले यांचे आवाहन
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ‘लेटर बॉम्ब’नंतर राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलेले आहे. त्यामध्ये आता रिपब्लिक पक्षाचे नेते रामदास आठवले यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपशी जुळवून घ्या, असे आवाहन केले आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून भाजपसोबत जुळवून घेण्याचं आवाहन केले. शिवसेनेने पुन्हा भाजपबरोबर यावं, अशा चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत.
www.konkantoday.com