कोल्हापूर जिल्ह्यातील ८ प्रमुख व २८ जिल्हा मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद
कोल्हापूर जिल्ह्यातील ८ प्रमुख व २८ जिल्हा मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद झाली आहे. याचबरोबर १११ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. संततधार पावसामुळे कोल्हापूरला महापुराचा धोका निर्माण झाला आहे. राजाराम बंधार्यावरील पाणी पातळी सकाळी ७ वाजता ४६.०७ फुटांवर गेल्याने पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली आहे. दरम्यान खेड्यातील गावांमधील ओढ्या नाल्याना पाणी आल्याने वाहतुक पूर्णत: बंद करण्यात आली आहे.बंद असलेल्या रस्त्यांमध्ये रत्नागिरी कोल्हापूर रस्त्यांचाही समावेश आहे
www.konkantoday.com