शासनाच्या सध्याच्या निकषाप्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा चौथ्या टप्प्यात,निर्बंधांमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता कमी

राज्य शासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे त्यामध्ये पाच टप्प्यांत लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट व ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी च्या आधारे पाच टप्प्यांत वर्गीकरण करण्यात आले आहे त्यानुसार चौथ्या टप्प्यासाठी पॉझिटिव्हिटी रेट १०ते २० टक्के किंवा ऑक्सिजन बेड अँक्युपन्सी ६०टक्क्यांहून जास्त असल्यास तो जिल्हा चौथ्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे.त्यानुसार रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ऑक्सिजन अँक्युपन्सी ५१.८१ व ६६.५६ असा आहे. तसेच आठवड्याचा एव्हरेज पॉझिटिव्हिटी रेट रत्नागिरीत १६.४५ तर सिंधुदुर्गात १२.७० इतकं आहे.यामुळे सध्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा चौथ्या टप्प्यात येण्याची शक्यता आहे.जर दोन्ही जिल्हे चौथ्या टप्प्यात राहिले तर कडक बंधने राहणार आहेत.यामध्ये अत्यावश्यक सेवेतील लोकांना संध्याकाळी चार वाजेपर्यंत मुभा राहणार आहे .परंतु इतर दुकाने व मॉल बंद राहणार आहेत .त्यामुळे अनेक दिवस प्रतीक्षेत असलेल्या व्यापाऱ्यांची पुन्हा निराशा होणार आहे .रेस्टॉरंट्सला पार्सल व होम डिलिव्हरी सेवा राहणार आहे.चौथ्या टप्प्या साठी इतर अटी व बंधने लागू आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button