
एकीकडे कोरोनाचं संकट वाढत असताना विमा कंपन्यांनी मात्र आता कोविड पॉलिसी धोरण बंद केले
एकीकडे कोरोनाचं संकट वाढत असताना विमा कंपन्यांनी मात्र आता कोविड पॉलिसी धोरण बंद केले आहेत. कोरोनामुळे मृत्यूचं प्रमाण वाढल्याने क्लेम देखील वाढले होते. त्यामुळे विमा कंपन्यांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. कंपनीला मिळालेल्या रकमेच्या एकूण १५० टक्के रक्कम क्लेम केल्यावर द्यावे लागतात. त्यामुळे नवीन पॉलिसी घेणाऱ्या आणि जुनी पॉलिसी रिनिव्ह करणाऱ्यांना आता समस्यांचा सामना करावा लागत आहे.
कंपन्यांनी आता सर्वसाधारण प्रिमियममध्ये ही वाढ केली आहे. त्यामुळे विमा कंपन्यांच्या भरवशावर असलेले लोकं आता संकटात आले आहेत.
देशभरात कोरोनाचं संकट वाढत आहे. देशात दररोज ४लाखांहून अधिक रुग्णांची भर पडत आहे.
www.konkantoday.com