
राज्यात गेल्या २४ तासांत बाधित रुग्णांच्या संख्येपेक्षा बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या जास्त
मुंबईसह राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिणाम गुरुवार रात्रीपासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशातच महाराष्ट्राला दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ६६ हजार ८३६ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, त्याचवेळी एकाच दिवसात ७४ हजार ४५ इतक्या रुग्णांनी करोनावर मात केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये असं पहिल्यांदाज घडलंय, जेव्हा नव्या बाधित रुग्णांच्या संख्येपेक्षा बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
www.konkantoday.com