बरे झालेले कोरोना रुग्ण रक्तदानास पुढे येत नसल्याने कोरोना रूग्णांना प्लाझ्माची प्रतिक्षा

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच गंभीर रूग्णांना प्लाझ्मा थेरपी लाभदायक ठरू शकते. जिल्ह्यात महिन्याला ६० बॅगची आवश्यकता आहे परंतु कोरोनामुक्त झालेले रूग्ण रक्तदानासाठी पुढे येत नसल्याचे उघड झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १० हजार रूग्ण बरे झाले आहेत परंतु यांनी रक्तदानाकडे पाठ फिरविल्याने नव्या रूग्णांसाठी प्लाझ्मा थेरपीचा अवलंब करणे अशक्य झाले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button