वाटद ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेची भाजपवर कुरघोडी ,सरपंच अंजली विभूते यांचा ना. सामंत यांच्या उपस्थितीत अवघ्या दोनमहिन्यात पुन्हा शिवसेनेत प्रवेश
वाटद ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेने भाजपवर कुरघोडी केली आहे भाजप पुरस्कृत सरपंच अंजली विभूते यांनी ना.सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ना. सामंत यांच्या उपस्थितीत अवघ्या दोनमहिन्यात पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत वाटद ग्रामपंचायतीमध्ये सरपंच निवडणुकीत धक्कादायकनिकाल समोर आला. याग्रामपंचायती मधील ११ पैकी ७जागा सेनेकडे तर ४जागाभाजपकडे आल्या. वाटद ग्रामपंचायतीमध्ये काटावरचे बहुमत असताना भाजपने या ठिकाणी करिश्मा करून दाखविला.शिवसेनेचे दोन सदस्य भाजपने गळाला लावले आणित्यांच्या मदतीने या ग्रामपंचायती वर भाजपने कब्जामिळविला. सरपंचपदी अंजली विभुते तर उपसरपंचपदीसुप्रिया नलावडे या विराजमान झाल्या होत्या.मात्र अवघ्या दोनच महिन्यात अंजली विभूते यांनी सेनेतप्रवेश केला आहे. उपजिल्हा प्रमुख बाबू म्हाप, तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी आणि इतर पदाधिकारीयांनी ना. सामंतयांच्या मार्गदर्शनाखाली वाटदग्रामपंचायत पुन्हा सेनेकडे वळवण्यात यश मिळवले
www.konkantoday.com