हवामान प्रतिकूलतेमुळे आंबा उत्पादनातही मोठी घट होण्याची भीती
अवकाळी पावसानंतर आता अतिरिक्त ठरणारा ‘हिट फॅक्टर’ आंब्याच्या दर्जावर परिणाम करणारा ठरणार आहे. त्यामुळे आधीच लांबणार्या आंबा हंगामाने स्थानिकांना हापूसची चव या वर्षी चाखायला मिळणे दुरापास्त होणार असल्याचे चिन्हे आहेत. एप्रिल महिन्यात असणार्या गुढी पाडवा आणि अक्षय्य तृतीया हे दोन्ही आंब्याचे नवं करण्याचे मुहूर्ताचे योग त्यामुळे चुकण्याची शक्यता आहे. हवामान प्रतिकूलतेमुळे उत्पादनातही मोठी घट होण्याची भीती आता निर्माण झाली आहे.
www.konkantoday.com