शिमगोत्सवासाठी येणार्‍या चाकरमान्यासाठी कोरोना चाचणी अहवालाबाबत सुधारित आदेश जिल्हा प्रशासनाने निर्गमित करावा, -आ. राजन साळवी

शिमगोत्सव साजरा करण्यासाठी मुळगावी येणार्‍या चाकरमान्यांची गैरसोय जिल्हा प्रशासनाने वेळेवर दूर करावी, अशी मागणी आमदार राजन साळवी यांनी केली आहे.
शिमगोत्सवासाठी येणार्‍या चाकरमान्यांना आगमनापूर्वी ७२ तास कोरोनाविषयक तपासणी सक्तीची करण्यात आली आहे. तपासणी अहवाल निगेटीव्ह असेल तरच चाकरमान्यांना मुळगावी येण्यास परवानगी दिली जाणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अजूनही वाढत आहे. कोरोनाविषयक तपासणी सक्तीची करण्याला लोकप्रतिनिधींचा कोणताही आक्षेप नाही. ७२ ऐवजी २४ तासाची तपासणी असा सुधारित आदेश जिल्हा प्रशासनाने निर्गमित करावा, अशी मागणी आ. राजन साळवी यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्याकडे केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button