तरूणाचे अपहरण! जीवाला धोका असल्याची भावाची तक्रार

वेळणेश्‍वर ः ट्रकवर क्लिनर म्हणून घेवून जातो असे सांगून ३४ वर्षीय तरूणाचे अपहरण केल्याप्रकरणी गुहागर पोलिसांत फिर्याद देण्यात आली आहे. जीवे मारण्याच्या उद्देशाने हे अपहरण केले गेल्याचाही तक्रारदाराचा आरोप आहे.
गुहागर तालुक्यातील जानवळे गावातील चर्मकारवाडीत राहणारा वैभव भालेकर यांच्याविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी उमेश पवार यानी दिलेल्या तक्रारीवरून ६ जून रोजी वैभव भालेकरने त्याला तुझा भाऊ शरण पवार याला आपल्या ट्रकवर क्लिनर म्हणून घेवून जातो असे फोन करून सांगितले. मात्र घरच्या लोकांशी त्याने त्यांचे बोलणे होवू दिले नाही. शरणच्या डोक्याला दुखापत झाल्याचे त्याने सांगितले. मात्र तो कोठे आहे याची माहिती दिली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button