
मालवाहतूक करणाऱ्या एस.टी. गाड्यांच्या सुरक्षिततेवरून राज्य परिवहन कामगार सेना आक्रमक
कोराेनाच्या काळात उत्पन्न बुडालेल्या एसटीचे उत्पन्न वाढावे यासाठी एसटी महामंडळाने मालवाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे मात्र
मालवाहतूक करणाऱ्या एस.टी. गाड्यांच्या सुरक्षिततेवरून राज्य परिवहन कामगार सेना आक्रमक झालीआहे राज्यपरिवहनमहामंडळा माल वाहतूक बसलाअपघात होवून देवरुखातील दोन चालक जखमी झाले आहेत.त्यामुळे मनसेचे राज्य परिवहन कामगार सेनेचेराज्यउपाध्यक्ष सुनिल साळवी आक्रमक झाले आहे. त्यांनी मालवाहतूककरणाऱ्या एस.टी. गाड्यांच्या सुरक्षिततेचीच भांडाफोड केलीआहे. जुन्या प्रवासी बसेसच्या सीट काढून त्या गाड्या मालवाहतूकी साठी वापरल्या जात असल्याचा आरोप केला जुन्या एसटी गाडय़ांच्या तुन मालवाहतूक केली जाते. ९ ते १० टन पेक्षा अधिक वजनाचीअवैधरित्या मालवाहतूक केली जात असल्याचा आरोप उपाध्यक्ष साळवी यांनी केला आहे. चालक मालवाहक गाडीच्या अपघाताला जबाबदार नाहीत. जे जबाबदार आहेत त्यांच्यावरतातडीने गुन्हा दाखल करावा. गुन्हा दाखल न झाल्या तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला.
www.konkantoday.com