नारायण राणे काय बोलतायत त्याकडे लक्ष देण्याची मुख्यमंत्र्यांना गरज नाही -आमदार वैभव नाईक

विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकत नसल्यामुळे कोरोनाचा बाऊ करून अर्थसंकल्पीय अधिवेशनातून मुख्यमंत्री पळ काढत असल्याची टीका काल खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केली होती. या टीकेला शिवसेनेचे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिलंय. नारायण राणे काय बोलतायत त्याकडे लक्ष देण्याची मुख्यमंत्र्यांना गरज नाही. तर लोकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. एक जबाबदार मुख्यमंत्री म्हणून ज्या गोष्टी कराव्या लागतील, त्या उद्धव ठाकरे करत आहेत.
लोकांनीसुद्धा त्या मान्य केल्या आहेत. मर्यादित स्वरूपात लग्न समारंभ, कार्यक्रम व्हावेत आणि गर्दी कमी व्हावी यासाठी लोकही आता प्रयत्न करतायत. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला लोकही प्रतिसाद देतायत. त्यामुळे राणे काय बोलतायत याकडे लक्ष देण्याची गरज नाही. लोकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे आणि ती योग्य प्रकारे उद्धवजी पार पाडत आहेत.
, ज्या प्रमाणे ठरलंय त्या प्रमाणे हे अधिवेशन पार पडेल. पार्लमेंटरी कमिटीची बैठक मंत्रालयात होतेय, त्यामुळे निश्चितच हे अधिवेशन पार पडणार असल्याचं वैभव नाईक यांनी सांगितलं आहे. मात्र नारायण राणेंनीच गेले अनेक वर्ष वेगवेगळ्या गोष्टीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राणेंच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचा पलटवार वैभव नाईक यांनी केला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button