रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात आमच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना २२३ ठिकाणी उमेदवारचं मिळाला नाही – ना.उदय सामंत

ग्रामपंचायत निवडणूकीत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील ६०० उमेदवारांपैकी शिवसेना पुरस्कृत २२३ उमेदवार बिनविरोध झाले आहेत. एकूण ६३ ग्रामपंचायतीपैकी ५५हून अधिक ग्रामपंचायतीत शिवसेना पुरस्कृत पॅनलची सत्ता असेल असे मत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ग्रामपंचायत निवडणूकीत काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता.आज सायंकाळी शिवसेना उपनेते आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत शिवसेना पुरस्कृत २२३ उमेदवार बिनविरोध झाले आहेत. १६ ग्रामपंचायती बिनविरोध जिंकल्या आहेत.रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात आमच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना २२३ ठिकाणी उमेदवारचं मिळाला नाही. यावरून त्यांनी आत्मपरीक्षण करावं.आतापर्यंत गावागावात झालेल्या विकासकामावरचं ही निवडणूक लढली जाईल.यानिवडणूकीत शिवसेना पुरस्कृत उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील. ६३ पैकी ५५ पेक्षा जास्त ग्रामपंचायती आम्ही जिंकू असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button