कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही,-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नाइट कर्फ्यू लावल्यावर अनेकांनी प्रश्न विचारले की, हा कोरोना काय रात्रीचा मोकाट सुटतो व दिवसा घरात बसतो काय? पण तसे नाही. कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. अजूनही आपल्याला बंधनाची आवश्यकता आहे. दिवसा लॉकडाऊन आपण करू शकत नाही, तशी वेळदेखील येऊ नये. पण निदान रात्रीची संचारबंदी म्हटल्यावर धोक्याची जाणीव नागरिकांना असते. अनावश्यक गर्दी टाळून मास्कचा वापर, हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे हे जर आपण पाळलं तर आपण या संकटावर मात करू शकतो, असा सावधगिरीचा सल्ला देतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्रीच्या संचारबंदीला विरोध करणाऱयांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button