अर्णब गोस्वामी यांना १४दिवसांची न्यायालयीन कोठडी

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यावर दाखल झालेल्या केसचा अलीबाग कोर्टातील युक्तीवाद संपला आहे. अर्णब गोस्वामी यांना १४दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अर्णब यांना आता १८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे. पोलिसांनी मागितलेली कस्टडी नाकारल्याने अर्णब यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या निर्णयाविरोधात अर्णब गोस्वामी मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहेत. पोलिसांनी मारहाण केल्याचा अर्णब गोस्वामी यांचा आरोपही कोर्टाने फेटाळला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button