
लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मराठा आरक्षण देण्यात आलंय का? या जनहित याचिकेवरील आरोपांबाबत राज्य शासनानं आपली भूमिका स्पष्ट करावी-मुंबई हायकोर्ट
लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मराठा आरक्षण देण्यात आलंय का? या जनहित याचिकेवरील आरोपांबाबत राज्य शासनानं आपली भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत.येत्या चार आठवड्यात सर्व प्रतिवादींनी आपली भूमिका स्पष्ट करावी असं हायकोर्टानं म्हटलं आहे. (भाऊसाहेब पवार यांनी यासंदर्भात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. यात त्यांनी आरोप केला की आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारनं १० टक्के मराठा आरक्षण लागू केलं आहे. हे आरक्षण समाजातील एकता, शिक्षण आणि रोजगाराच्या समान संधी याच्याविरोधात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.www.konkantoday.com