रत्नागिरी शहरातील तारांगणाचे काम लॉकडाऊनमुळे व पावसाळ्यामुळे रेंगाळले

रत्नागिरी शहराच्या माळ नाका येथील शहर मंजूर विकास आराखड्यातील उभारण्यात येणाऱ्या तारांगणाचे बांधकाम सुरू आहे. निर्मल इन्फ्रास्ट्रक्चरकडून हे काम केले जात आहे. 5 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाचे हे तारांगण ऑक्टोबर 2020 मध्ये पूर्ण होणे आवश्यक होते. परंतु, अद्याप 50 टक्केपर्यंतच काम झाल्याचे दिसून येत आहे.यातील स्थापत्य बांधकाम 3 कोटी 93 लाख रुपये इतक्या खर्चाचे आहे. दोन वर्षांच्या मुदतीत हे काम पूर्ण करून देणे अपेक्षित होते. मात्र आता या कामाला 24 ऑक्टोबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी मक्तेदार कंपनीकडून करण्यात आली. ही वाढीव मुदत नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेने मंजूर केली आहे लॉकडाऊनमुळे व पावसाळ्यामुळे हे काम रेंगाळले आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button