
‘आत्मनिर्भर भारत” हा देशवासियांचा नवा मंत्र :- मोदी
स्वातंत्र्य दिनावर कोरोनाचं सावट असलं तरीही संपूर्ण काळजी घेऊन 74 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सातव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित केले.
PM मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
आत्मनिर्भर भारत बनणं गरजेचं आहे.
देशात कोरोनाच्या तीन लसी विविध टप्प्यात, प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याची रूपरेखा तयार
आजपासून National Digital Health Mission चा आरंभ केला जातोय.
प्रत्येक भारतीयाला हेल्थ ID दिला जाईल, यात तुमची संपूर्ण आरोग्यविषयक माहितीअसेल.
काही महिन्यांत N-95 मास्क, PPE किट, वेंटिलेटर विदेशातून आयात करावे लागत होते. मात्र आज भारतात याचं उत्पादन सुरू करण्यात आलं.
भारत केवळ स्वत:ची गरज पूर्ण करत नाही तर इतर देशांना मदतीचा हात देत आहे.
सायबर सुरक्षेसाठी एक रणनिती आखण्यात येणार आहे.
Vocal For Local ही स्वतंत्र भारताची मानसिकता असायला हवी
भारताने परकीय गुंतवणुकीचे रेकॉर्ड मोडले
देशाच्या विकासात शिक्षणाचं खूप महत्व आहे. त्यामुळेच तीन दशकांनंतर आम्ही देशाला एक नवं शिक्षण धोरण दिलं आहे.
अंदमान निकोबारला ऑप्टिकल फायबरने जोडलं जात आहे. चेन्नईत जसं वेगवान इंटरनेट आहे तसंच या बेटांवरही असेल
जगाच्या अर्थव्यवस्थेत भारतासारख्या देशाचं योगदान वाढणं, ही आजची गरज आहे
देशाच्या संपूर्ण पायाभूत विकासाला नवी दिशा देण्याची गरज आहे
देशातील तरुण, महिला शक्तीवर माझा पूर्ण विश्वास
कोरोनाच्या संकटातही कोट्यावधी गरिबांना मोफत गॅस मिळाला. 80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य पोहचवण्यात आलं.
‘मेक इन इंडिया’सोबत ‘मेक फॉर वर्ल्ड’ या मंत्रासह पुढे जायचं आहे
आत्मनिर्भर भारतासाठी समतोल विकास गरजेचा आहे. यासाठी आम्ही मागास असलेल्या 110 जिल्हे निवडले आहेत
जलजीवन मिशनला आज एक वर्षं झालंय. दररोज आम्ही 1 लाखापेक्षा जास्त घरांत पाईपने पाणी पोचवत आहोत
आपल्या आयुष्याची पर्वा न करता डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस, संरक्षण व्यवस्था, अनेक लोक 24 तास काम करत आहेत.
कोरोनाच्या या संकटकाळात ‘सेवा परमो धर्मा’ची भावना आपल्यासोबत आहे.
पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करत देशाच्या वीर जवानांना सलाम केले.