नाणार हा विषय शिवसेनेसाठी संपलेला आहे- नामदार उदय सामंत
नाणार हा विषय शिवसेनेसाठी संपलेला आहे. काही जण हा विषय पुन्हा काढून अस्तित्वासाठी प्रयत्न करीत आहेत. मालवण वायंगणी-तोंडवळी येथील नियोजित सी-वर्ल्ड प्रकल्प कमीतकमी जागेत उभारण्यास शिवसेना तयार आहे; पण त्यासाठी स्थानिकांनी सहमती दिली पाहिजे. ही सहमती मिळाली तर आम्ही शासकीय अथवा खासगी संस्थेमार्फत हा प्रकल्प उभारू, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्गात पत्रकार परिषदेत दिली.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी पक्षप्रमुख म्हणून यापूर्वीच नाणारविरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आमदार भास्कर जाधव यांनी या प्रकल्पाचे समर्थन केले तरी हा प्रकल्प होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे; कोकणातील प्रकल्पांना शिवसेना नेहमीच विरोध करीत आली आहे. त्यांचा हा विरोध राजकीय फायद्यासाठी असल्याचा आरोप होत असल्याकडे लक्ष वेधले असता, पालकमंत्री सामंत म्हणाले, मी माझ्या मतदारसंघात पर्यटनावर आधारित पाच प्रकल्प आणले आहेत. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी कोकणात पर्यटन प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे.”
www.konkantoday.com