चतुर्थश्रेणी कर्मचार्यांच्या पाठोपाठ ४ ऑगस्टला परिचारिकांचे काम बंद आंदोलन
अपुर्या मनुष्यबळामुळे चतुर्थश्रेणी कर्मचार्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला असतानाच आता महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने पद भरतीसाठी दि. ४ ऑगस्टला काम बंदचा इशारा दिला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच कर्मचार्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. शुक्रवारी परिचारिका संघटनेने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना लेखी निवेदनाद्वारे आंदोलनाची नोटीस दिली आहे.
www.konkantoday.com