कणकवली उड्डाणपुलाचा तपासणी अहवाल येईपर्यंत काम थांबवा- खासदार विनायक राऊत

कणकवली येथील आत्तापर्यंत उभारणी झालेल्या उड्डाणपुलाची गुणवत्ता तपासणी अहवाल येईपर्यंत पुलाचे पुढील काम सुरू करू नका, असे निर्देश खासदार विनायक राऊत यांनी कशात हायवे ठेकेदार प्रतिनिधींना दिले.
खासदार राऊत यांनी कोसळलेल्या उड्डाणपुलाच्या भागाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी उड्डाणपूल उभारणीचे काम थांबविण्याचे निर्देश ठेकेदाराला दिले असल्याची माहिती दिली. तसेच उड्डाणपुलाचा सध्या जो भाग कोसळला आहे, तो पूर्णतः काढला पाहिजे. तेथील शिगा आरपार गेलेल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण स्लॅबला धोका पोचलेला असू शकतो. ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे
www.Konkantody.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button