रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील १५ महाविद्यालयांसाठी मुंबई विद्यापीठाने मदतीचा हात पुढे केला
निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील १५ महाविद्यालयांसाठी मुंबई विद्यापीठाने मदतीचा हात पुढे केला आहे. विद्यापीठाच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून या महाविद्यालयांना रुपये ५६ लाखांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेमध्ये याबाबत ठराव करण्यात आला आहे.
www.konkantoday.com