केवळ सात दिवस क्वारंटाईन करण्यास सरपंच संघटनेचा तीव्र विरोध

यापूर्वी १४ दिवस संस्थात्मक व नंतर १४दिवस होम क्वारंटाईनचा नियम असताना आता केवळ सात दिवसांचे क्वारंटाईन करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने परवानगी दिली आहे का? असा सवाल करत गणेशोत्सवासाठी येणार्‍या चाकरमान्यांचे केवळ सात दिवस क्वारंटाईन करण्यास सरपंच संघटनेचा तीव्र विरोध असल्याचे अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष संतोष राणे यांनी सांगितले. गणेशोत्सवासाठी येणार्‍या चाकरमान्यांचे नियमानुसार ‍१४ दिवस क्वारंटाईन करण्यात यावे, अथवा जिल्ह्याच्या सीमेवर स्वॅबची स्पॉट टेस्ट घेऊन त्याचा अहवाल सोबत घेऊनच चाकरमान्यांना गावात पाठवावे. अन्यथा ग्राम सनियंत्रण समिती अध्यक्षपदाचा सरपंच सामूहिकरित्या राजीनामा देतील, तसेच प्रशासनाला असहकार करतील, असा इशारा संतोष राणे व कणकवली तालुका सरपंच संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button