मुंबई-गोवा महामार्गावर उद्यापासून म्हणजे 27 ऑगस्टपासून ते गणेशोत्सव संपेपर्यंत पळस्पे ते वाकण फाटा दरम्यान 16 टना पेक्षा अधिक वजनाच्या वाहनांना वाहतुकीस बंदी अवजड


मुंबई-गोवा महामार्गावर उद्यापासून म्हणजे 27 ऑगस्टपासून ते गणेशोत्सव संपेपर्यंत अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे.सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.

अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग कोणता?

मुंबई-गोवा हायवेचं काम जलदगतीने पूर्ण होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. पळस्पे ते वाकण फाटा दरम्यान 16 टना पेक्षा अधिक वजनाच्या वाहनांना वाहतुकीस बंदी असेल. ही वाहने जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून खोपोली ते पाली मार्गे वाकण फाटा इथं पर्यंत येतील तिथून पुढे कोकणात जातील. यातून अत्यावश्यक सेवा, दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, लिक्वीड ऑक्सीजन यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना वगळण्यात आले आहे.

मुंबई गोवा महामार्गमार्गाचं काम 12 वर्षे रखडलंय

मुंबई गोवा महामार्गमार्गाचं काम 12 वर्षे रखडलंय. गणेशोत्सवापूर्वी या रस्त्याच्या एका लेनचे काम पूर्ण व्हावे यासाठी शासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता सिबिटी तंत्रज्ञान वापरलं जातंय.मुंबई-गोवा हायवेच्या एका लेनच काम गणेशोत्सवाच्या आधी पूर्ण होईल असे आश्वासन

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरच्या एका लेनच काम गणेशोत्सवाच्या आधी पूर्ण होईल अशी ग्वाही देण्यात आलीय. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ग्वाही दिलीय. तर डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण महामार्गाचं काम पूर्ण होईल अशी प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण यांनी दिलीय.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button