
फणसवळेत बीएसएनएल २जी सेवा दीड महीने बंद तर ३जी सेवा दोन आठवडे बंद – ग्राहक संतप्त
रत्नागिरी – शहारानजीकच्या फणसवळे गावातील बीएसएनएल सेवा गेली दीड महीने बंद आहे. याबाबत रितसर तक्रार करून देखील दुर्लक्ष होतेय. आमच्या कडे मनुष्यबळ नाही, आमचा नाईलाज आहे, हे सबब पुढे केली जाते. कोरोना सारख्या महामारीत हे संपर्क माध्यम बंद असल्याने परिसरातील ग्राहकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
टेलिफोन बीला मध्ये विविध कर व शुल्क आकारून ग्राहकांकडून ते वसुल केले जातात. पण कामगार नाहीत, केबल नाही ही कारणे सांगून बंद झालेली सेवा पूर्ववत करण्यास विलंब होतो. दीड महीने तक्रार करूनही तक्रारीकडे दुर्लक्ष होतेय. कोरोना विषाणू प्रादुर्भाव काळात शासन, प्रशासन सर्व शक्तीनिशी काम करत असताना, बीएसएनएल सारखे संपर्क माध्यम बंद ठेऊन चालेल का ? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.त्वरित सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी फणसवळे ग्रामपंचायत सदस्य सुमेश आंबेकर यांनी केली आहे.
www.konkantoday.com