निवृत्तीनाथान च्या पालखी साठी 71 हजार चार्ज लावणारे राज्यसरकार हिंदू रूढी परंपरांचा अनादर करणारे आणि ऐपत नसलेले :- दीपक पटवर्धन


आम्ही पालख्या विमानाने नेऊ अशी घोषणा करणाऱ्या सरकारने निवृत्ती नाथांच्या पालखी साठी 71 हजार भरून घेते ही बाब सरकारला लांच्छनास्पद आहे. सारकाची आर्थिक ऐपत संपलेली आहे. अशी खरमरीत टीका भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केली. आता परिवहन मंत्री वारकऱ्यांचे पैसे परत देऊ म्हणत आहेत ही सारवासारव आहे. बुंद से गयी वो हौद से नही आती हे सेनेच्या विज्यातीय सरकारला सांगण्याची वेळ आली आहे. अस पटवर्धन म्हणाले.
शिवसेनेचे हे सरकार स्वाभिमान हरवून बसलाय हिंदू रूढी परंपरा न चा अनादर आणि ईदी साठी कोट्यवधींची खेरात ही सापत्न वागणूक आहे. हिंदू रूढी
परंपरांना अवमानित करण्याचा सरकारचा हा कावा आहे. वारकर्यांना त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरी पर्यंत पोचू देण्या पासून परावृत्त करण्या चा वारकरी बांधवांच्या श्रध्येय भावनांची थट्टा करण्याच राज्य शासनाचा हेतू होता की काय असा संशय निर्माण करणारी ही स्थिती आहे.
पालखी साठी परिवहन महामंडळ 71 हजार भरून घेते ग्रामपंचायतींच्या निधी वर डोळा ठेवते या शासनाची आर्थिक पत ऐपत संपली आहे. राज्य शासन सपशेल अपयशी असून कोणत्याच आघाडी वर या सरकारला प्रभावी काम करता येत नाही हे स्पष्ट होतंय असे पटवर्धन म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button