संकल्प युनिक फाउंडेशन रत्नागिरी यांचे वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

नुकत्याच दापोली तालुक्यात निसर्ग वादळाने तेथील जगजीवन विस्कळीत झाले शिवाय तालुक्यातील डोंगराळ भागात लोकांना दैनंदिन आहारामध्ये वापरले जाणारे वस्तू सुद्धा शिल्लक नव्हते.संकल्प युनिक फाउंडेशन रत्नागिरी यांचे ही गंभीर बाब निदर्शनास आल्याने नेमके कोण कोण आणि किती कुटुंबिय या पासून वंचित आहेत याची पाहणी केली आणि आज रविवारी दापोली येथील पाळंदे,हर्णे बौध्दवाडी,पाजपंढरी येथील दुर्गम भागात जावून 100 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
त्या भागातील लोकांकडे आजपर्यंत कोणतीच मदत न मिळाल्याचे त्यांनी सांगितले,गेले 22/23 दिवस लाईट ही नव्हता अशा वेळी त्यांची उपासमार थांबविण्याचे काम संकल्प युनिक फाउंडेशन रत्नागिरी यांनी केले.आणि खरोखरच गरजवंतांना या वस्तू देण्यात आल्या.
संकल्प युनिक फाउंडेशन रत्नागिरी यांनी लॉक डाउन काळातही सामाजिक भावनेतून विविध उपक्रम राबविण्यात आले.संकल्प युनिक फाउंडेशन रत्नागिरी यांचे या उपक्रमाचे विविध स्तरावरून कौतुक होत आहे.
जीवनावश्यक वस्तूंचे संकलन करण्यासाठी एनजीओ *संकल्प युनिक फाउंडेशन रत्नागिरी यांचे सर्व सभासदांनी खूप मेहनत घेतली.
दापोली दौऱ्यात एनजीओ चे अध्यक्ष दिलावर कोंडकरी, उपाध्यक्ष शकील गवाणकर, खजिनदार सयीद मुल्ला, रुग्ण मदत केंद्र प्रमुख ईस्माइल नाकाडे यांनी सहभाग घेतला.या दौ-याचे वेळी पत्रकार मुश्ताक खान यांनी मोलाचे सहकार्य केले.तसेच संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते येथील एनजीओ च्या शाखेतून ही मदतीचा हात मिळाला.मजीद नेवरेकर, कॅप्टन हनीफ खलफे,तैमिना वणू,इरम नेवरेकर, रफीक नेवरेकर आदींनी सहकार्य केले.
याही पुढे आपण अशाच प्रकारे सामाजिक कार्य सर्वांचे सहकार्य घेवून करु असे एनजीओ रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष दिलावर कोंडकरी यांनी सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button