रत्नागिरी शहरात विजेचा लोळ कोसळल्याने काही घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळली

सलग दोन दिवस मुसळधार पर्जन्यवृष्टी झालेल्या रत्नागिरी शहरात गुरूवारी दुपारी अचानक विजेचा लोळ कोसळल्याने खालची आळी भागातील अनेकांची विजेची उपकरणे जळली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.
बुधवार व गुरूवार असे सलग दोन दिवस विजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळत असताना गुरूवारी दुपारी अचानकपणे विजेचा लोळ राजिवडा, खालची आळी, मांडवी व आजुबाजूच्या परिसरातून गेला. हा लोळ ज्या भागातून गेला त्या भागातील घरांवर मोठा आवाज आल्याने नागरिकांची भीतीने गाळण उडाली. खालची आळी येथील ढवळेवाडीमधील अरूण आंबेकर, भाई वीर, प्रवीण वीर, पांडुरंग वीर, लक्ष्मण मांडवकर यांच्या घरातील सेटअपबॉक्स, टीव्ही, फॅन आदी उपकरणे बंद पडली त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button