
आतापर्यंत महावितरणची जिल्ह्यातील ४७ पैकी ४४ उपकेंद्रे पूर्ववत सुरु करण्यात यश
निसर्ग’ चक्रीवादळाचा महावितरणला मोठा फटका बसला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४७ पैकी ४४ उपकेंद्रे पूर्ववत सुरु करण्यात यश आले आहे. तर जिल्ह्यातील ४ लाख २१ हजार बाधित वीजग्राहकांपैकी ३ लाख ६६ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
निसर्ग चक्रीवादळाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले. वीज यंत्रणा उघड्यावर असल्याने या आस्मानी संकटातून महावितरणही सुटले नाही. रत्नागिरीला दुसर्याच दिवशी कोल्हापूर परिमंडलाकडून सहा व बारामती परिमंडलाकडून तीन अशी ९ पथके रवाना झाली आहेत. दुरुस्तीसाठी आवश्यक साधनसामुग्री व वाहनांसह ही सर्व पथके खेड व चिपळूण विभागात कार्यरत आहेत
www.konkantoday.com