
माजी आमदार नातू आता निवडणूका नसताना बोलायला लागले. हे आश्चर्य नव्हे, तर मोठा विनोदच -शिवसेना नेते रामदास कदम
विधासभेच्या निवडणुकशिवाय कधीही तोंड न उघडले माजी आमदार नातू आता निवडणूका नसताना बोलायला लागले. हे आश्चर्य नव्हे, तर मोठा विनोदच म्हणायला हवा. नातू यांना नेमके काय झोंबले हे कळेनासे झाले , अशी उपरोधिक टीका शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली.
गेल्या आठवड्यात कदम यांच्या दौर्यावर माजी आमदार नातू यांनी टीका केली होती. त्याचा समाचार घेताना रामदास कदम म्हणाले, माझ्या दौर्यामध्ये मी कुठेही सामाजिक अंतराचा नियम तोडलेला नव्हता. तहसील कार्यालयामध्ये जी बैठक घेतली, त्या बैठकीला जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर वरिष्ठ अधिकारी होते.या बैठकीमध्ये नियमा प्रमाणे अंतर ठेवून आसन व्यवस्था होती. कुठेही नियमांचा भंग होऊ दिला नाही.मात्र विनय नातू यांना अचानक असे काय झाले की कोणतीही शहानिशा न करता माझ्यावर तुटून पडले. आहे, असे कदम यांनी सांगितले.
पक्ष बघून किंवा पुढारी बघून कोरोना होत नाही हे नातुकडून शिकण्याची आवश्यकता नाही. मात्र प्रवीण दरेकर मुंबईतून रत्नागिरीत आलेले आपल्याला कसे चालले, फक्त भाजपाच्या नेत्याच्या दौर्याने कोरोना होत नाही असे आहे की काय, असा चिमटाही कदम यांनी काढला.
www.konkantoday.com