
महापुरात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणलेली नगर परिषदेची बोट धुळखात पडली.
पावसाळ्यादरम्यान उदभवणारा महापूर लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चिपळूण नगर परिषदेकडून शहरातील मुख्य ठिकाणच्या मार्गावर बोटी ठेवल्या जातात. महापुरावेळी अडकलेल्या नागरिकांनी या बोटीतून सुरक्षितस्थळी नेण्यासाठीची महत्वाची भूमिका आपत्ती व्यवस्थापनेतील कर्मचारी बजावत असतात, असे असले तरी पावसाळा संपूनही1 मध्यवर्ती बसस्थानका ठिकाणी ठेवलेली आपत्ती व्यवस्थापन बोट क्र. ३ ही बोट अद्यापही त्याच ठिकाणी असून पालिकेच्या दुर्लक्षाअभावी या बोटीवर साचलेल्या धुळीमुळे या बोटीचा रंगच बदलून गेला आहे.www.konkantoday.com